Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIND Vs AUS : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस; भारताला दिली फलंदाजी

IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस; भारताला दिली फलंदाजी

रोहित, शुभमनच्या फटकेबाजीला सुरुवात; रोहितचे दोन चौकार

अहमदाबाद : आज क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) सगळ्यांत मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताच्या इच्छेप्रमाणे प्रथम फलंदाजी करण्याचीच संधी भारताला मिळाली आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubhman Gill) सध्या मैदानात उतरले आहेत. तुफान फटकेबाजीला सुरुवात करत त्यांनी प्रचंड धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला द्यायचे ठरवले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाही तितक्याच ताकदीनेफिल्डंग करत आहे. रोहित शर्माने होत असलेले दोन चौकार ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी अडवले. मात्र, पुढच्या दोन चेंडूंवर शानदार खेळी करत रोहितने दोन चौकार ठाकले आहेत. दोन ओव्हर्समध्ये भारताने १३ धावा केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -