कोरोना रुग्णसंख्येत वाढ; देशात नवे १८०५३ कोरोनाबाधित

Share

नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत १६ हजार ५६१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. ११ ऑगस्ट रोजी देशात १६ हजार २९९ नवीन रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेने आज रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण ०.२८ टक्के आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५३ टक्के आहे.

देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एक दिलासादायक बाब म्हणजे देशात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर ५.४४ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी दिवसभरात १८ हजार ५३ रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण ४ कोटी ३५ लाख ७३ हजार ९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सध्या देशात १ लाख २३ हजार ५३५ सक्रिय कोरोनाबाधित आहेत.

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाणार आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या २४ तासांत २७०० हून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीननुसार, गेल्या २४ तासांत २७२६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये यावर्षी २ फेब्रुवारीनंतर एका दिवसांत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. तसेच, काल दिवसभरात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट १४.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा आलेख दिवसागणिक वर जाताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीत मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातही पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Recent Posts

Yami Gautam : यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पावलांनी आला छोटा पाहुणा!

'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…

7 mins ago

Loksbaha Election : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १५.९३ टक्के मतदान!

जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…

56 mins ago

Eknath Shinde : राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार! उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…

1 hour ago

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

3 hours ago

उन्हाळ्यात मध खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…

3 hours ago

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…

5 hours ago