नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) (repo rate) आज तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे (एमपीसी) निर्णय जाहीर केले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी समितीचे चलनविषयक धोरण जाहीर केले. यावेळी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली. यानंतर रेपो दर ६.२५ टक्के झाला आहे.
शक्तिकांत दास यांनी सांगितले की एमपीसीच्या ६ पैकी ५ सदस्यांनी रेपो दरात बहुमताने वाढ करण्यास समर्थन दिले आणि त्यानंतर आरबीआयने रेपो दर ०.३५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आरबीआयने सलग पाचव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे.
गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, “आम्ही आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या शेवटी आलो आहोत आणि केवळ देशातच नाही तर जगातील अनेक देशांनी महागाईचा दर वाढलेला पाहिला आहे. जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे देशातील पुरवठा साखळी परिस्थिती आव्हानांना तोंड देत आहे. चलनवाढीचा दर वरच्या स्तरावर असताना बँक पत वाढ सध्या दुहेरी अंकांच्या वर येत आहे.”
दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; नेमकं प्रकरण काय? नवी दिल्ली : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL 2024)…
भाजपात होणार सामील? जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत काल ठाकरे गटाला (Thackeray Group)…
निवडणुकीच्या काळात आंध्रप्रदेशमध्ये दोन दिवसांत दोन पैशांच्या घटना हैदराबाद : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात…
जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : मागच्या महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या…
सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश; काय आहे प्रकरण? भोपाळ : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर…
मविआच्या नेत्यांसोबत का दिसले झिरवाळ? दिंडोरी : सध्या देशभरात लोकसभेची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे.…