पुणे (वार्ताहर) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळ्याने मंगळवारी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये रात्री प्रवेश केला आहे. वाल्हे गावी मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पालखीने सकाळीच लोणंदच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मंगळवारी निरामधील दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात. पादुकांचे निरा नदीच्या पाण्याने स्नान घातले जाते. गेले अनेक वर्ष या स्नानाची परंपरा सुरू आहे.
कोळी समाज त्यांच्या होडीतून पालखी नीरा नदीतून पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देत, तेव्हा इथं पादुकांना स्नान घालण्यात यायचं. तेव्हापासूनच्या या परंपरेत खंड पडू नये म्हणून कोरोनाशी निगडित नियमांचे पालन करून ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडण्यात आला. आळंदीतून प्रस्तान होण्याआधी माऊलींच्या पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान घालण्यात आले.
त्यानंतर पादुकांना निरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले आणि आता शेवटी पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये स्नान घालण्यात येणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षे पायवारी सोहळा होऊ शकला नाही. यंदा पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांसोबतच पालखी मार्गावरील लहान गावांमध्येही उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.
मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स…
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…
मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल…
मुंबई: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगतो.…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…
देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…