कणकवलीत तीन ग्रामपंचायती भाजपकडे बिनविरोध

Share

आमदार नितेश राणे यांच्या गाव विकासाच्या संकल्पनेला जनतेचा पाठिंबा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने यशस्वी घोडदौड सुरू केली आहे. आमदार नितेश राणे यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील शिडवणे आणि वायंगणी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध भाजपकडे आल्या आहेत.

शिडवणे ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आले आहेत. त्यांना गावातून भाजपचा सरपंच म्हणून बिनविरोध निवडून दिले आहे तर वायगणी सरपंच पदी भाजपच्या अस्मी लाड या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

तर ओझरम सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या समृद्धी राणे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांनाही गावातील जनतेने भाजपचा सरपंच म्हणून बिनविरोध निवडून दिले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने विजयी सलामी दिली आहे.

शिडवणे येथील ग्रामपंचायत वर सरपंच म्हणून रवींद्र शेट्ये हे बिनविरोध निवडून आले. तर तर प्रभाग एक मधून कोमल कृष्णा शेटये, दीपक जीवबा पाटणकर, प्रभाग दोन मधून दयानंद दिनकर कुडतरकर, शांताराम यशवंत धुमाळ, सुप्रिया पांचाळ, प्रभाग तीन मधून राजश्री गोकुळ शिरसेकर, स्मिता मनोहर टक्के, सुप्रिया योगेश पाष्टे, यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हे सर्व उमेदवार विरोधी उमेदवार नसल्यामुळे बिनविरोध निवडून आले आहेत.

Recent Posts

Summer Hair Care : उन्हाळ्यात केसांची काळजी सतावते आहे का? मग घ्या केसांची ‘अशी’ काळजी

मुंबई : उन्हाळ्याच्या वाढत्या कडाक्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यातील प्रचंड उकाडा आणि लागणाऱ्या तीव्र…

44 mins ago

Robot Wedding : अजब गजब! तरुण चक्क रोबोटसोबत बांधणार लग्नगाठ

जाणून घ्या नक्की प्रकरण काय? जयपूर : लग्न म्हटलं की नवरी, नवरदेव, वऱ्हाडी मंडळी आलीच.…

3 hours ago

बॉयफ्रेंडच्या एका सल्ल्याने तरुणीचे उजळले नशीब; बनली लखपती

चक्क ४१ लाखांची लागली लॉटरी वॉशिंग्टन डी.सी : जगभरात कोणाचं नशीब कधी व कसं बदलेल…

3 hours ago

Arvinder Singh Lovely : काँग्रेसला आणखी मोठा धक्का! दिल्ली प्रदेशाध्यक्षाचा पक्षाला रामराम

पदाचा राजीनामा देत सांगितले 'हे' कारण नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election 2024) काँग्रेसच्या…

4 hours ago

Mumbai University Exams: लोकसभा निवडणुकीचा विद्यार्थ्यांना फटका; मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या

'असं' असेल नवे वेळापत्रक मुंबई : देशभरात निवडणुकांची (LokSabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात…

5 hours ago

farmer scheme : शेतकऱ्यांना ‘या’ तीन योजना ठरताहेत वरदान; होणार चांगला फायदा

जाणून घ्या कोणत्या आहेत त्या योजना? मुंबई : कडकडीत ऊन व अवकाळी पाऊस अशा बदलत्या…

6 hours ago