कोकण पर्यटकांनी हाऊसफुल्ल; समुद्रकिनारे गजबजले

Share

रत्नागिरी :नाताळ सणानंतर आता नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात दाखल झालेल्या हजारो पर्यटकांनी कोकण हाऊसफुल्ल झाले आहे. पर्यटकांचा सर्वाधिक ओढा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून दोन्ही जिल्ह्यातील हॉटेल्ससह एमटीडीसीची रिसॉर्टदेखील फुल्ल झाली आहेत. यावर्षी कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असून कोकणातील पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वाधिक पसंती समुद्र किनाऱ्यांना दिल्याने रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील प्रत्येक समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजून गेले आहेत.

राज्यासह इतर राज्यांतील पर्यटकांनी कोकणाला पसंती दिल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे. या पर्यटकांसाठी शासनाने काही विशेष सुविधा पुरवल्या नसल्या तरी येथील निवास, न्याहारी, हॉटेल्स तसेच ग्रामीण पर्यटनावर आधारित अशा सुविधा, वॉटर स्पोर्ट्स अशा सर्व सोयींमुळे पर्यटक आता कोकणात स्थिरावू लागले आहेत. पर्यटकांचा ओढा हा समुद्रकिनाऱ्यांकडे अधिक असून तेथे आनंद लुटतानाच पर्यटक जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांचीही सैर करू लागले आहेत. परिणामी आतापर्यंत गाडीतून कोकणचे दर्शन घेत गोव्याकडे धाव घेणारे पर्यटक आता येथे स्थिरावू लागले असल्याने खऱ्या अर्थाने पर्यटन व्यवसाय आता रुजू लागल्याचे दिसत आहे.

असे असले तरी शासनाने या पर्यटन व्यवसायाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी नववर्ष स्वागतासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांनादेखील आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags: कोकण

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

7 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

11 hours ago