सांगली (वार्ताहर) : विधवा महिलांना सौभाग्यालंकार कायम ठेवण्याचा ठराव विविध ठिकाणी होत आहे. असे असताना सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील इनामधामणी ग्रामपंचायतीने विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देत पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडचा आदर्श समोर ठेवत जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्याचबरोबर सांगली महापालिकेच्या महासभेसमोरही हा प्रस्ताव पुढील बैठकीत घेण्यात येणार आहे.
विधवा महिलांना सौभाग्यालंकार कायम ठेवण्याचे ठराव केले जात असताना मिरज तालुक्यातील इनामधामणी ग्रामपंचायतीने विधवा महिलांच्या पुनर्विवाहाच्या हक्काला पाठिंबा देऊ केला आहे. त्याचबरोबर या महिलांना संसारोपयोगी साहित्य देऊन महिलांना पूनर्वसनासाठी मदत करण्यात येणार आहे. सरपंच आश्विनी कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसरपंच अनिता पाटील यांनी विधवांना पुनर्विवाह करण्यास सहमती देण्याचा ठराव मांडला.
या ठरावाला सदस्या राजमती मगदूम यांनी अनुमोदन दिले. विशेष म्हणजे पुनर्विवाह करणाऱ्या विधवा महिलांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार आहे.
सिक्कीममध्ये पुन्हा प्रेमसिंग तमांग यांचे सरकार नवी दिल्ली : जून रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या…
दोघांची सखोल चौकशी करण्यासाठी सरकारी वकीलांचा युक्तिवाद पुणे : पुण्यातील (Pune) कल्याणीनगर भागात झालेल्या कार…
महिलेचे हातपाय बांधले...तोंडात कापसाचा गोळा कोंबला...अन्... अलिबाग : हेल्मेटधारी अज्ञाताने रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील ७०…
कोट्यवधी रुपये खर्च करूनही पुलाचे काम ४ वर्षांपासून अर्धवट पुणे : पर्यटकांसह हजारो नागरिकांची वर्दळ…
पोस्ट शेअर करत दाखवली 'लाहोर १९४७'ची झलक मुंबई : दमदार अभिनय आणि उत्तम व्यक्तिमत्व म्हणून…
मृतदेहाचे १४ तुकडे केले अन्... भोपाळ : मध्य प्रदेशातील (MP) भोपाळमधून (Bhopal Crime) एक धक्कादायक…