आर्यनला उच्च न्यायालयाचा दिलासा

Share

मुंबई – बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा (shaharukh khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आर्यनची यापुढील काळामध्ये पोलिसांना किंवा इतर कुठल्याही यंत्रणेला चौकशी करायची असल्यास तीन दिवस अगोदर त्याची पूर्वकल्पना द्यावी, असे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात संशयित आरोपी म्हणून एनसीबीने आर्यन खानला अटक केली होती. त्याला काही दिवस चौकशीसाठी कोठडीतही ठेवण्यात आले होते.

आर्यन खान प्रकरणात आज झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने सांगितले की, दर आठवड्याला मुंबईच्या एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट आर्यनला शिथिल करण्यात आली आहे. तसेच दिल्लीच्या एनसीबीला चौकशी करायची आवश्यकता वाटली तर ७२ तास आधी आर्यनला नोटिस द्यावी लागेल त्यानंतर त्याची चौकशी होईल.

आर्यनने आपल्यावर ज्या जाचक अटी आहेत त्याच्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. त्यामध्ये त्याने त्या अटींचा सहानुभूतीने विचार करुन त्या शिथिल करण्यात यावे, असे म्हटले होते.

न्यायाधीश सांबरे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाबाबत सुनावणी केली. तसेच अॅड. अमित देसाई यांनी आर्यन खान साठी युक्तीवाद केला. सध्या या प्रकरणाचा तपास दिल्ली एसआयटी करत आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये आर्यन खान सहित मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना २८ ऑक्टोबरला न्यायालयाने जामीन दिला होता. तसेच १४ अटींचे पालन करण्यास न्यायालयानं बजावले होते.

Recent Posts

महाभारतातील ज्ञानकर्ण

विशेष: भालचंद्र ठोंबरे अर्जुन युधिष्ठिरचा वध करण्यास निघतो, तेव्हाचा कौरव पांडवांमधील महाभारताच्या युद्धाचा १७वा दिवस.…

15 mins ago

अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचे ‘पंचम’ करणार गावांना सक्षम…

फिरता फिरता: मेघना साने अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन ही संस्था दरवर्षी महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्थांना निधी…

22 mins ago

‘या’ मानसिकतेचे करायचे काय?

प्रासंगिक:अरविंद श्रीधर जोशी अगदी परवाचीच गोष्ट, एका बैठकीसाठी भाईंदरला गेलो होतो. ठाण्याला परत यायला निघालो.…

27 mins ago

सोशल मीडिया, प्री टीन्स आणि टीनएजर्स

आनंदी पालकत्व: डाॅ. स्वाती गानू हे तर निर्विवाद सत्य आहे की, प्री-टीन्स असो की टीनएजर्स…

37 mins ago

‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा…’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे प्रसिद्ध बंगाली साहित्यिक शक्तीपद राजगुरू यांच्या ‘नया बसत’ या कादंबरीवर आधारित ‘अमानुष’(१९७५)…

47 mins ago

मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी

कोकणी बाणा: सतीश पाटणकर मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले…

58 mins ago