उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने १६ जणांचा मृत्यू

Share

डेहराडूनः उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने भीषण स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवरून नद्या वाहत असल्याचे चित्र आहे. तर नद्यांना मोठा पूर आला आहे. उत्तरखंडमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत.

चंपावत जिल्ह्यात एक घर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नदीला पूर आल्याने बांधकाम सुरू असलेला पूलही वाहून गेला आहे. नैनी तलाव ओव्हर फ्लो झाला असून त्याचे पाणी आता रस्त्यांवरून वेगाने वाहत असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नैनी तलाव तुडूंब भरून वाहत आहे. रस्ते बंद आणि वीज पुरवठा खंडीत झाला आहे. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. मुसळधार पावसामुळे नैनीताल, रानीखेत, अल्मोडा ते हल्द्वानी आणि काठगोदामपर्यंत रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

उत्तराखंडमध्ये अनेक भागांमध्ये होत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी पर्यटक अडकल्याचं सांगण्यात येतंय. एसडीआरएफ आणि उत्तराखंड पोलिसांनी जानकी चट्टी येथून भाविकांना रात्री उशिरा सुरक्षित गौरीकुंडमध्ये पोहोचवण्यात आलं. केदारनाथचे दर्शन घेऊन परतत असताना हे भाविक अडकले होते. पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला होता. गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर मंदाकिनी नदीच्या पलिकडे अडकलेल्या अनेक भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. मुसळधार पावसात एसडीआरएफने आतापर्यंत २२ भाविकांना वाचवले आहे. चारधाम यात्राही स्थगित करण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या १० टीम तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडच्या ७ जिल्ह्यांमध्ये या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. डेहराडून, अल्मोडा, पिथोरागढ, हरिद्वार यांच्यासह इतर जिल्ह्यांमध्ये या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसंच केदारनाथच्या दर्शनासाठी गेलेल्या ४ हजार भाविकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भाविकांना सहकार्य करण्याच्या सूचना संबिधत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Recent Posts

Rohit Sharma: आयुष्यात आधीही ही मी…आयपीएलमध्ये कर्णधारपद घेतल्यानंतर रोहित पाहा काय म्हणाला…

मुंबई: या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४साठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता…

1 hour ago

Food Tips: ही ५ फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी

मुंबई: फळे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होते. फळांमध्ये ती…

2 hours ago

Nitesh Rane : निवडणूक आयोगाला प्रश्न विचारुन संजय राऊतने अकलेचे तारे तोडू नयेत!

आमदार नितेश राणे यांचा राऊतांना खोचक सल्ला उद्धव ठाकरे आम्हाला शिव्याशाप देऊन आमचंच मताधिक्य वाढवतात…

3 hours ago

अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणार या ३ राशींचे चांगले दिवस, सोन्याप्रमाणे चमकणार नशीब

मुंबई: अक्षय्य तृतीया यंदाच्या वर्षी १० मेला साजरी केली जात आहे. यावेळेस अक्षय्य तृतीयेला गुरू-चंद्राच्या…

3 hours ago

पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे निवडून येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास प्रचंड शक्तिप्रदर्शनासह डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल कल्याण…

3 hours ago

50MP सेल्फी कॅमेरा, Curved AMOLED डिस्प्लेसोबत लाँच झाला Vivo V30e 5G, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

मुंबई: व्हिवोने आज अखेर आपला फोन भारतात लाँच केला आहे. विवोने या सीरिजमधील दोन फोन…

4 hours ago