मुंबई (हिं.स.) : मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या भाषणात राज्यपालांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केले. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे राज्यपालांनी सांगितले.
भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
जाणून घ्या तिथी, वेळ आणि महत्त्व मुंबई : चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला चैत्र…
हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार शिर्डी : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडत…
जाणून घ्या कोणत्या राज्यात किती टक्के मतदान मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आज…
पवार विरुद्ध पवार सामन्यात कोणता नवा ट्विस्ट? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आज…
शुभ दिवशी सोने खरेदीवर मिळणार 'ही' विशेष सवलत मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या…
पालघरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने होती नाराजी मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) पालघर लोकसभेची (Palghar Loksabha) जागा…