Supriya Sule : मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी!

Share

पवार विरुद्ध पवार सामन्यात कोणता नवा ट्विस्ट?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आज तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी (NCP) सर्वात चुरशीची लढत असलेल्या बारामती मतदारसंघातही (Baramati Loksabha) मतदान होत आहे. मात्र, त्यातच शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक लक्ष वेधून घेणारी कृती केली आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे अजित पवार विरुद्ध शरद पवार (Ajit Pawar VS Sharad Pawar) असा संघर्ष टोकाला गेलेला असतानाच सुप्रिया सुळे या बारामतीतील मतदानाच्याच दिवशी थेट अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी जाऊन धडकल्या आहेत. या नव्या ट्विस्टमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बारामतीत सध्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) असा लढा आहे. बारामतीत राष्ट्रवादीचा मतदार विभागला आहे. मात्र, त्यातच सुप्रिया सुळेंनी एक नवी खेळी खेळली आहे. मतदान केल्यानंतर त्या कोणालाही सोबत न घेता अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या. या भेटीमागील कारण सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आशाताई पवार म्हणजेच अजित पवारांच्या आईच्या भेटीसाठी त्या इथे दाखल झाल्याचं त्या म्हणाल्या. मात्र, केवळ काकींचा आशीर्वाद घेणं हेच एक कारण या भेटीमागे असू शकतं का यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भेटीनंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या काटेवाडीमधील घरी जाऊन अजित पवारांच्या आई आशा पवार यांची भेट घेतली. यावेळी घरी अजित पवार आणि सुनेत्रा पवार नव्हत्या. काकींना भेटण्यासाठी आपण आलो होतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘आशा काकींना भेटायला आली होती, त्यांचा आशिर्वाद घ्यायला आली होती’, असं त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं.

मतदानावर होऊ शकतो परिणाम

बारामतीमध्ये मतदानासाठी अजून काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे जे आता मतदान करणार आहेत, त्यांच्यावर या भेटीचा काही परिणाम होणार का आणि मते फिरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निवडणुकीत प्रचाराच्या वेळी पवार वि. पवार अशी लढाई दाखवण्यात आली मात्र हे कुटुंब एकच आहे का? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे लढाई होत असताना दोन्ही नेते कुटुंब म्हणून एक राहणार असतील, तर मतदार किंवा कार्यकर्ते नक्कीच विचार करतील.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

4 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

5 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

5 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

5 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

6 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

6 hours ago