मोनिश गायकवाड
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीच्या घटना नित्याच्या झाल्या असून बुधवारी सकाळी सहा वाजता पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील अरीहंत कंपाऊंड येथील खाद्य तेल व औषधे साठविलेल्या गोदाम इमारतीस आग लागून दहा गोदामे जळून खाक झाली आहेत.
तळ अधिक एक मजली या इमारतीत टोरेंट फार्मास्युटीकल्स कंपनीचे गोदाम असून तेथे तळमजल्यावर खाद्य तेल, तर पाहिल्या मजल्यावर औषध साठा साठविलेला होता. या आगीत उग्र रूप धारण करीत गोदामातील संपूर्ण साठा जळून जात असतानाच आगीच्या धगीमुळे संपूर्ण इमारत मागील बाजूस कोसळून तेथील चाळीचे नुकसान झाले आहे.
आगीची महिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन, तर आगीची व्याप्ती वाढल्याने कल्याण व ठाणे येथील प्रत्येकी एक अशा चार फायर फायटर गाड्यांनी स्थानिक पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग सात तासांनी आटोक्यात आली. या आगीच्या ज्वालांनी या गोदाम इमारतीचा मागील संपूर्ण हिस्सा मागील बाजूस असलेल्या सुशांत चौधरी यांच्या चाळीवर कोसळला, त्यामुळे चाळीतील दोन खोल्यांचे नुकसान झाले असून एक दुचाकी ढिगाऱ्या खाली गाडली गेली.
या दुर्घटनेनंतर स्थानिक तलाठी सुधाकर कामडी, यांनी पूर्णा ग्रामपंचायत व नारपोली पोलीस यांच्या मदतीने घटनास्थळी आग विझविण्यासाठी खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…