‘आपल्या विविध बँक खात्यांपैकी नागपूर येथील बँक खात्यावर आयकर खाते लक्ष ठेवून आहे. सावध राहा,’ असा मोबाइलवरून एका अनोळखी व्यक्तीकडून एका व्यापाऱ्याला कॉल आला होता. सुरुवातीला व्यापाऱ्याने गांभीर्याने घेतले नव्हते; परंतु चार ते पाच दिवस सतर्कतेबाबत केलेल्या फोनमुळे या व्यापाऱ्यालाही आपल्या खात्यामध्ये काही गडबड तर नाही ना? याबाबत मनात भीती निर्माण झाली. त्यामुळे फोन करणारी व्यक्ती आणि व्यापारी यांच्यामध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण झाले. आपली कोणीतरी काळजी घेत असल्याचे व्पापाऱ्याला वाटू लागले होते. या व्यापाऱ्याला आयटी विभाग लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे आणि वेळप्रसंगी अटकेची कारवाई होऊ शकते असा धमकीवजा इशारा त्या अनोळखी व्यक्तीने दिला आला. अटक टाळण्यासाठी आपल्याला तडजोड करावी लागेल, असे सांगत त्या व्यक्तीने व्यापाऱ्यांकडे पैशांची मागणी सुरू झाली. भीतीपोटी, या व्यापाऱ्याने त्याला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २१ लाख रुपये भरले,” शिवाय, व्यापाऱ्याच्या नावाने अवैध पार्सल कॅनडाला पाठवले जात असल्याचा आरोप केला गेला होता. त्यामुळे व्यापारी घाबरला होता. मात्र, आपली फसवणूक झाली असल्याचे या व्यापाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर या व्यापारी व्यक्तीने या घटनेची माहिती नवी मुंबई पोलिसांना दिली. “या वर्षीच्या ६ ते ११ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला होता. सायबर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह भारतीय दंड संहिता कलम ४२०(फसवणूक) आणि ३४(सामान्य हेतू)अंतर्गत फसवणूक करणाऱ्या अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पीडितेच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी, पोलिसांनी व्यवहारात गुंतलेली सर्व बँक खाती तातडीने गोठवली, ज्यात त्यावेळी एकत्रितपणे १८ लाख ८० हजार ३१७ रुपये होते. तांत्रिक मार्गदर्शनाचा उपयोग करून, पोलिसांनी यशस्वीरीत्या गुन्हेगाराचा चेन्नई येथे शोध लावला आणि चेन्नईतल्या अन्नानूर येथून लोकेशकुमार नावाच्या आरोपीला ९ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. पोलिसांनी तांत्रिक माहितीवर काम केले. या रॅकेटमध्ये आणखी काही लोक सामील असण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे काम सायबर पोलिसांकडून केले जात आहे. पोलिसांच्या समयसूचकेमुळे संबंधित आरोपीचे बँक खाते गोठवल्यामुळे, व्यापाऱ्याचे नुकसान वाचले आहे. त्याला ते पैसे परत मिळू शकतात; परंतु या गुन्ह्याचा मास्टर माईड कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.
maheshom108@gmail.com
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केला कुंभार यांचा सत्कार मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यातले मतदान उद्या होत असल्यामुळे वाहन चालनाच्या कोणत्याही प्रकारच्या…