मुंबई : मुंबईतील भायखळा परिसरातील मुस्तफा बाजारजवळील एका लाकडी गोदामाला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान या भीषण आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्त हानी झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ५.१५ च्या सुमारास मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला ही भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे टँकरच्या मदतीने या आगीवर ९ वाजता नियंत्रण मिळवले. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करण्यात आले. या आगीत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. ही आग लेवल २ ची होती, अशी माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी के.डी. घाडीगावकर यांनी दिली.