Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्र बंदला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही

महाराष्ट्र बंदला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही

मुंबई : लखीमपूर खेरी येथील हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र ज्या दादरमध्ये शिवसेना भवन आहे, त्याच दादरच्या मंडईत शेतमाल विकला गेला. सकाळी १० पर्यंत मंडईतील सर्व व्यवहार झाले. त्यामुळे दादरमध्ये शेतकरी आणि व्यापारांनी महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न दिल्याचे चित्र दिसले.

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला बंदचे आवाहन केले. परंतु साेलापूरमध्ये पहाटे शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला आणि विकला. तसेच वाहतूकही सुरळीत सुरू होती. औरंगाबादसह राज्यातील अनेक मंडईत शेतमालाची विक्री करण्यात आली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आणि जनतेने महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद दिला नाही.

साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे यांनी स्वत: दुचाकी चालवत पुकारलेला बंद धुडकारला. तसेच शिर्डीतील सर्व व्यवहारही सुरू आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -