वाडा (वार्ताहर) : वाडा महावितरणचा सध्या मनमानी कारभार सुरू असून ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज बिले देणे, विजेचा खेळखंडोबा व विद्युत मीटर नसतानाही बिले आकारणे असे अनेक प्रकार वाढीस लागले आहेत. तालुक्यातील रायसल येथील एका महिलेच्या घरात विद्युत मीटर नसतानाही तिला विजेचे बिल देण्यात आल्याने सदर महिलेने तक्रार केली आहे.
तालुक्यातील रायसल या गावात रेश्मा गंगाराम गवारी ही महिला राहात असून सदर महिलेने नवीन मीटर घेण्यासाठी महावितरणकडे ११६५ रुपये भरले आहेत. मात्र, आजतागायत तिच्या घरात विद्युत मीटर बसवण्यात आला नाही. तथापि, असे असतानाही रेश्मा यांना जुलै महिन्याचे ६८ युनिट पडल्याचे दाखवून १८७० रुपये वीज बिल देण्यात आले आहे. मीटर बसवलेला नसतानाही वीज बिल आल्याने रेश्मा यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता वाडा यांना तक्रार देऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा रेश्मा गवारी यांनी महावितरणला दिला आहे. यासंदर्भात वाडा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची चौकशी करतो, असे त्यांनी सांगितले.
मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…
मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…