मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे.
काही महिन्यांपूर्वी १ हजार १६५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली होती. आता २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होणार असून १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहेत.
तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार : १८ नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची मुदत : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
अर्ज छाननी : ०५ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याचा दिनांक : ७ डिसेंबर
निवडणूक चिन्ह वाटप : ७ डिसेंबर दुपारी ३ नंतर
मतदानाची तारीख : १८ डिसेंबर
मतमोजणी आणि निकाल : २० डिसेंबर
निकालाची अधिसूचना : २३ डिसेंबर
ठाकरे गटाच्या जहिरातीवरुन चित्रा वाघ यांचा परखड सवाल मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)…
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत केला गुन्हा दाखल शिमला : भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर…
कंटेंट रिपोस्ट करणार्यांना बसणार आळा मुंबई : अनेक लोकांपर्यंत झटक्यात पोहोचण्याचं इन्स्टाग्राम (Instagram) हे फार…
कुटुंबियांच्या दाव्याने उडाली खळबळ मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ १४ एप्रिल…
जवाहर मैदानावर दुपारी १ वाजता होणार जाहीर सभा रत्नागिरी : मतदानाला आता अवघे काही दिवसच…
डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे करणार अर्ज दाखल नाशिक : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक…