Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीश्रीलंकेतील हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू

श्रीलंकेतील हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू

अनेक राजकीय नेत्यांची घरे जळून खाक

कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील परिस्थिती आणखी चिघळली आहे. सरकारविरोधी निदर्शकांनी राजपक्षे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री सनथ निशांत यांच्या घराला आग लावली. एवढेच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी कोलंबोमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांना मारहाण केल्याची देखील घटना घडली आहे.

जमावाने महिंदा आणि गोटाबाया यांचे वडील डी ए राजपक्षे यांच्या स्मरणार्थ बांधलेले मेदामुलाना, हंबनटोटा येथील स्मारकेही नष्ट केली आहेत.

या हिंसाचारात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार भडकवल्याप्रकरणी महिंदा राजपक्षे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -