Categories: रायगड

वादळी पावसामुळे मुरूड किनाऱ्यावरील मासेमारी ठप्प

Share

मुरुड (वार्ताहर) : गेल्या आठ दिवसांपासून समुद्रात सुरू असलेल्या वादळी हवामानामुळे अरबी समुद्रात मासेमारी करणे जोखमीचे आणि बेभरवशाचे झाले आहे. मुरूड समुद्रात मासेमारीस गेलेल्या जवळपास छोट्या- मोठ्या सुमारे १०० नौका मासे न मिळाल्याने राजापूरी, एकदरा, मुरूड, नांदगाव, मजगाव आदी खाडी बंदरात सोमवारी आणि मंगळवारी रिकाम्या हाताने परतल्या. मच्छीमारांवर मासेमारी बाबत संकटांची मालिकाच सुरू असून शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रायगड मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी केली आहे.

मासेमारीचा मोठा हंगाम असला तरी समुद्रात अचानक बदलणाऱ्या वातावरणामुळे किनाऱ्यावर आलेले मासे काही कालावधीतच खोल समुद्रात निघून जात आहे. अचानक उठलेले उपरती वारे व हेटशी वाऱ्यांमुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळत असल्याने पारंपरिक नौका घेऊन खूप खोलवर मासेमारीस जाणे धोकादायक झाले आहे. शिवाय मासे मिळेल याची या वादळी स्थितीत शक्यता नाही. गेल्या आठ दिवसात अनेक कोळीबांधव नुकसान सोसून किनाऱ्यावर परतले आहेत. मार्केट मध्ये पापलेट, घोळ, सुरमई, रावस आदी मासळीबरोबर बोंबिल देखील आता दिसून येत नाहीत. समुद्रात वादळ सदृश परिस्थिती असून ते मच्छीमारांसाठी धोकादायक असल्याचे मुरूड येथील काही मच्छीमारांनी सांगितले.

राजापूरी येथील मच्छीमार धनंजय गिदी यांनी सांगितले की, जवळा देखील सध्या मिळत नाही. सामान्य प्रकारची मासळी मिळाली तरी पावसामुळे सुकवायला जागा नाही. लहरी हवामान मच्छीमारांच्या जीवावर उठले असून पारंपरिक मच्छीमार पार हवालदिल झाला आहे. मासळी पकडून त्यांची विक्री करणे या दिनक्रमावर कोळी बांधवांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या दोन्ही बाजू ठप्प असल्याचे कोळी बांधवांनी सांगितले. सध्या सर्व नौका पाण्यात किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. मुख्य मासेमारी कधी पूर्वपदावर येणार याची चिंता कोळीबांधवाना लागली आहे.

Recent Posts

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

22 mins ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

2 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

2 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

3 hours ago

मुंबईकरांच्या विकासाला कौल देणारी निवडणूक

सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…

8 hours ago

होर्डिंग काळ बनून येतो तेव्हा…

विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…

9 hours ago