Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीपाच वर्षांनी डी.एस. कुलकर्णींची जामिनावर सुटका

पाच वर्षांनी डी.एस. कुलकर्णींची जामिनावर सुटका

मुंबई: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णीी (DS Kulkarni) पाच वर्षांनी जामिनावर तुरूंगाबाहेर आले आहेत. गुंतवणूकदार तसेच बँकेच्या फसवणुकीप्रकरणी २०१८मध्ये त्यांना अटक (arrest) करण्यात आली होती. त्यांच्यावर गुंतवणूकदार आणि बँकेने फसवल्याचा आरोप होता. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या होत्या

डी. एस. कुलकर्णी पाच वर्षानंतर जामिनाच्या जोरावर तुरुंगाबाहेर आले आहेत. पाच वर्षे तुरुंगात असलेले डीएसके यांना अखेर जामीन मिळाला आणि ते तुरुंगाबाहेर आलेत. याआधीही त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता मात्र त्यांना तुरुंगाबाहेर येता आले नव्हते. त्यांच्या १३५ मालमत्ता आहे. या प्रकल्पांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे.

डीएसके यांच्या विविध बँकांचे १२०० कोटींचे कर्ज आहे. तसेच डीएसकेंनी गुंतवणूकदारांची दोन हजार कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच डीएसके ग्रुपने अधिक व्याज देत असल्याचे अमिष दाखवत राज्यातील हजारो लोकांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.

तसेच या प्रकरणात डीएसकेंची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी आणि जावई यांच्याविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कुलकर्णींना कुठल्याही मराठी विकासक किंवा मराठी अस्मितेचे गळे काढणाऱ्या राजकीय नेत्याने मदत केली नाही.हा माणूस अननुभवी किंवा अतिधाडसी असेलही पण इतर व्यवसायीकांसारखा कावेबाज आणि पाताळयंत्री वाटत नाही. कायदा आपलं काम करेलच, पण एका गरीब कुटुंबातून वर आलेल्या मराठी माणसाला आपण मदत करायला हवी होती.

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -