डिजिटल पेमेंट : भारताने टाकले विकसित देशांना मागे!

Share

मुंबई (वृत्तसंस्था) : २०१३-१४ मध्ये भारतात डिजिटल पेमेंट सिस्टिमचा फारसा प्रसार झाला नव्हता; मात्र २०१४ मध्ये भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली. आता तर भारताने अनेक विकसित देशांना डिजिटल पेमेंटच्या बाबतीत मागे टाकले आहे.

भारतात २०१४ पूर्वी होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमधले अनेक आर्थिक व्यवहार किंवा पैशांची देवाण-घेवाण चेक किंवा रोखीच्या स्वरुपात व्हायची. तेव्हा ई-पेमेंटचा पर्याय उपलब्ध होता; मात्र फार थोडे लोक त्याचा उपयोग करत होते. २०१३-१४ च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते की, २०१३-१४ या आर्थिक वर्षात ऑनलाईन पद्धतीने एकूण २२० कोटी रुपयांचेच आर्थिक व्यवहार झाले होते. रोख पद्धतीने करण्यात येणाऱ्या पैशांच्या देवाणघेवाणीमुळे टॅक्सची चोरी वाढते. त्यामुळेच केंद्रात सत्तेत येताच मोदी सरकारने जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल पद्धतीने व्हावेत यावर भर दिला.

मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २०१४ मध्ये पहिल्यांदा केंद्रात सत्तेत आले तेव्हा केंद्र सरकारने सर्वात आधी डिजिटल पेमेंट पद्धतीला प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले. याचा परिणाम आज आपल्याला दिसून येत आहे. आज जवळपास भारतातला एक मोठा वर्ग पैशांच्या देवाणघेवाणीसाठी डिजिटल पेमेंट पद्धतीचाच वापर करत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका राहिली ती स्मार्टफोनची. स्मार्टफोनमुळे ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करणे अधिक सोपे झाले. पैशांचे डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे कर चोरीला मोठ्या प्रमाणात आळा बसला. सोबतच मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात जवळपास ४५ कोटी जनधन खाती उघडण्यात आली.

या खात्यांमुळे डिजिटल पेमेंट सिस्टिम अधिक मजबूत झाली. २०२०-२१ या आर्थिक वर्षात जवळपास ५५५४ कोटी रुपयांचे व्यवहार डिजिटल मार्गाने झाले तर २०२१-२२ मध्ये हाच आकडा वाढून ७४२२ कोटी रुपयांवर पोहोचला.भारतामध्ये डिजिटल पेमेंटचा एवढ्या वेगाने प्रसार होत आहे की २०२०-२०२१ मध्ये भारताने चीन, दक्षिण कोरिया सारख्या देशांना देखील डिजिटल व्यवहारांमध्ये मागे टाकले.

Recent Posts

Mumbai Local : जीवनवाहिनी ठरतेय जीवघेणी! केवळ तीन महिन्यांत रेल्वे प्रवासात ५६५ जणांचा बळी

प्रवासी संघटनांनी व्यक्त केला संताप मुंबई : लोकल म्हणजे मुंबईकरांची (Mumbai Local) जीवनवाहिनी समजली जाते.…

13 mins ago

Kiran Sarnaik : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीला अपघात; ५ जणांचा मृत्यू!

मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश; तर तीन जण जखमी अकोला : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या…

48 mins ago

Nashik Loksabha : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! विजय करंजकरांची बंडखोरी

उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवल्याचा केला आरोप नाशिक : लोकसभेच्या दृष्टीने नाशिकची जागा (Nashik Loksabha)…

1 hour ago

PM Modi : “डरो मत, भागो मत”, पंतप्रधान मोदींनी रायबरेलीच्या उमेदवारीवर राहुल गांधींची उडवली खिल्ली!

नवी दिल्ली : काँग्रेसने आज उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा केली.…

2 hours ago

Voting Awareness : मतदानाला जावंच लागतंय! मेट्रोही देणार मतदानाच्या दिवशी सवलत

मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाचा निर्णय मुंबई : मतदान (Voting) हा प्रत्येक नागरिकाचा हक्क…

2 hours ago

Gurucharan Singh : गुरुचरण सिंह यांनी बेपत्ता होण्याचा प्लॅन स्वतःच आखला?

दहा दिवसांनंतर समोर आली मोठी अपडेट नवी दिल्ली : 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak…

3 hours ago