महाड : किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाची राजधानी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली.
दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याकरिता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमीत्ताने छत्रपती उदयन राजे यांनी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत झाले पाहीजे हे देखील सांगितले. आम्ही मावळे आहोत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पंतप्रधान मोदींकडे जाऊ आणि महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे झाले पाहिजे ही भावना निश्चित पूर्ण करू असे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना, राज्यातील प्रत्येक प्रमुख सहा शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित उद्याने ५०-५० कोटी रुपये खर्च करून तयार करणार आहोत. त्याच सोबत भरत गोगावले यांची शिवसृष्टीची मागणी आहे. त्याला देखील मी समर्थन देतो आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी शिफारस करतो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…