Categories: ठाणे

केडीएमसीच्या “ह” प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

Share

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या “ह” प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम कुंभारखान पाडा, होली क्रॉस स्कूल समोरील बांधकामधारक मनोज म्हात्रे, मंदार म्हात्रे, मयूर म्हात्रे यांच्या तळमजल्यासह सहा मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामाचे स्लॅब पाडण्याची कारवाई मंगळवारी दिवसभरात केली. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई करतेवेळी या ठिकाणी महापालिकेची यंत्रसामग्री व मनुष्यबळ पोहचू नये, याकरिता बांधकामधारकांनी इमारतीकडे जाण्या-या रस्त्यात वाहने ऊभी करुन अडथळा निर्माण केला होता. तथापी संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पोलीस विभागामार्फत अडथळा दूर करण्याची कारवाई झाल्यानंतर तोडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि ४ काँक्रीट ब्रेकर व २० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली. सदर बांधकामधारकांवर यापूर्वीच एम.आर.टी.पी.चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांना कल्याण डोंबिवली‍ परिसरात घरे घेताना महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात किंवा नगररचना विभागाकडे बांधकामाच्या अधिकृततेबाबत चौकशी करुन घरे विकत घेण्याचे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Recent Posts

लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…

54 mins ago

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…

1 hour ago

UPSC : युपीएससी परीक्षार्थींना दररोज ३००० रुपये देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…

2 hours ago

नरेंद्र मोदीच हॅटट्रिक करणार! पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…

2 hours ago

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…

5 hours ago

निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…

6 hours ago