उल्हासनगर :वर्ष २०१७ पासून आजपर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक कामे केली. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेंगुर्ले गावाचा अभ्यास करून, बोध घ्यावा व स्थानिक विकासकार्य घडवून आणले पाहिजे असे मत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ते वेंगुर्ले गावात पत्रकारांशी बोलत होते. आमदार रवींद्र चव्हाण हे वेंगुर्ले नगर परिषद येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह मधील कवी आरती प्रभू रंगमंचाच्या नुकत्याच झालेल्या लोकार्पण सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थितीत होते. या रंगमंचाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.
या सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, स्थानिक नगरसेवक प्रशांत आपटे, उल्हासनगरचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी, कपिल अडसूळ तसेच अन्य मान्यवर मंचावर उपस्थितीत होते. रवींद्र चव्हाण म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीचे प्रशासन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी राजकारण करण्यापेक्षा वेंगुर्ले नगरपरिषदेसारखे विकास कार्य घडवून आणले पाहिजे.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले नगराध्यक्ष गिरप यांचे कौतुक करत, कोकणी माणसाने आपला एक उद्योग सुरू करावा असा सल्ला दिला.
कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार…
अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना) अठराव्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांना निवडण्यासाठी,…
विश्वरंग: उमेश कुलकर्णी काही देशांत विद्यार्थी चळवळींनी देशातील राजकारण बदलून टाकले आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरले,…
KKR vs LSG: लखनौ विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीला आली. कोलकातासाठी…
दिनेश पाटील, गणेश गायकर यांची पत्रकार परिषदेत माहिती पेण (देवा पेरवी): पेण मधील साई भक्तांनी…
मुरुड( संतोष रांजणकर): मुरुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहावयास मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटकांनी…