अवकाळीमुळे रब्बी पिकांना धोका

Share

पालघर (प्रतिनिधी) :पालघर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात चांगलाच बदल झाला आहे.

पालघर जिल्ह्यात वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यात हरभरा, मूग, वाल, तीळ व अन्य रब्बी पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. पण यंदा जिल्ह्याचे ऋतूचक्र बदलल्यामुळे शेतकरी रब्बी पिके घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. अवकाळी पावसामुळे यंदा खरीप पिकाचेही अतोनात नुकसान झाले. तो अनुभव गाठीशी असल्यामुळे शेतकरी रब्बी पिकांची लागवड करण्यास मागे पुढे करत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वाल, हरभरा, तीळ व मूग इ. कृषी उत्पादने घेतली जातात. पण ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

रब्बी पिकावरही संक्रांत – शांताराम भोईर, वाडा

यंदा निसर्गाने पाठशिवणीचा खेळ चालवला आहे. अवकाळी पावसाने खरिपाच्या हंगामात धुमाकूळ घातला, आता पावसाळी वातावरणामुळे रब्बी पिकावरही संक्रांत आली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी पार खचून गेले आहेत.

सध्याच्या वातावरणामुळे लागवड थांबवली- आत्माराम दुमाडा, विक्रमगड

दरवर्षी तीळ व हरभऱ्याच्या पिकाची लागवड करतो. पण सध्या असलेले वातावरण लक्षात घेऊन तूर्तास थांबलो आहे.

Recent Posts

Hindu temples : मुंबईतील प्राचीन मंदिर बाबुलनाथ

कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…

3 hours ago

प्रेमकहाणी भाग-१

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…

4 hours ago

Drought : डोळे उघड माणसा…

विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…

4 hours ago

Mahabharat : महाभारत युद्धातील जेवण व्यवस्थेचे रहस्य

विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…

4 hours ago

साठवण…

विशेष : नीता कुलकर्णी गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची... आमच्या परीक्षा झाल्या की, आई वर्षभराच्या…

4 hours ago

Nostalgic song : हसता हुवा नुरानी चेहरा…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…

4 hours ago