डहाणूखाडी पूल बनला मासे सुकवण्याचा ओटा

Share

डहाणू (वार्ताहर) : डहाणू-पालघर तालुक्याला जोडणाऱ्या खोंडा खाडीवर असणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूंकडील फुटपाथचा मासळी सुकवण्याचा ओटा केल्याने फिरायला येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय निर्माण झाली आहे.

डहाणू आणि पालघर तालुक्यांना जोडणाऱ्या धाकटी डहाणूच्या खोंडा खाडीवर ४०० मीटर लांबीचा दक्षिणोत्तर पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंला जनतेला जाण्या-येण्यासाठी दीड मीटर रुंदीचा फूटपाथ आहे. पालघर हे जिल्हा मुख्यालय झाल्याने या पुलावरून हजारो मोठ-मोठ्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शिवाय, डहाणूच्या रिलायन्स एनर्जीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राख भरून वीस वीस टन वजनाचे डंपर सतत येत जात असतात. त्यामुळे पुलालाच थोका निर्माण झाला आहे,असे असले तरी नागरिक वाहनांच्या भीतीने फुटपाथवरून प्रवास करत असतात.

धाकटी डहाणू येथील काही मच्छीमार महिला या फुटपाथवर बिनदिक्कत करंदी, जवळा, फुकट अशी लहान-लहान मच्छी सुकत टाकून फुटपाथ सतत भरलेला असतो. त्यामुळे सकाळच्या वेळी फिरायला येणाऱ्यांची आणि संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्यास येणाऱ्या पर्यटकांची फारच अटचण होते. शिवाय, काही लोकांना ह्या सुकत टाकलेल्या माशांचा वास सहन होत नसल्याने त्यांना अधिकच त्रास सहन करावा लागतो.

आता तर पुलाच्या उत्तरेकडील तडीयाळे तलावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेवरच बोंबील मासे सुकवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बांबूच्या माळी (ओलाणी) घालून त्यावर बोंबील सुकवले जातात. मात्र, बोटीतून येणारे ओले बोंबीलाच्या राशी या रस्त्यावरच टाकण्यात येतात. त्यामुळे वाहनांना, प्रवाशांना त्रास होतोच, शिवाय सततच्या पाण्याने या रस्त्यावरही खड्डे पडत असतात याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आणि प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दि. ९ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध प्रतिपदा ०६.२३ पर्यंत. नंतर द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र कृतिका.…

1 hour ago

लालूंचे मुस्लीम प्रेम; इंडिया आघाडीला धास्ती

देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा…

4 hours ago

एकत्रित परिवहन प्राधिकरणाची नांदी

मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ…

5 hours ago

कोकणचा मेवा हरवलाय…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकणची भूमी म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न असं…

5 hours ago

SRH vs LSG: हैदराबादचा धमाकेदार विजय, लखनऊला १० विकेटनी हरवले

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक…

8 hours ago

उच्च न्यायालयाच्या इमारतीचे तत्काळ सेफ्टी ऑडिट करा

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्ष जुन्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी…

8 hours ago