मोदीजींच्या कर्तृत्वावर अगणित लघुपट निर्माण होऊ शकतात – चंद्रकांत पाटील

Share

पुणे (हिं.स.) : नरेंद्र मोदीजींचे कर्तृत्व इतके मोठे आहे की; त्यांच्या कर्तृत्वावर अगणित लघुपट निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने आयोजित ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेतील विजेत्यांचा रविवारी कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, नाट्य व सिनेअभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मानसी मागीकर, युवा अभिनेते आरोह वेलणकर, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश संयोजक ॲड. शैलेश गोजमगुंडे, प्रदेश प्रभारी लक्ष्मण सावजी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्तृत्व इतके मोठे आहे की; त्यावर अगणित लघुपट निर्माण होऊ शकतात. कोविड आणि त्यानंतरच्या काळातील मोदीजींच्या अनेक निर्णयांमुळे देशाचा संपूर्ण जगात नावलौकिक वाढला. कोविडनंतर रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे संपूर्ण जगाला इंधन टंचाईचा सामना करावा लागला. त्यातून आपल्या शेजारील पाकिस्तानसह अनेक देशांचे अर्थचक्र कोलमडले. पण मोदीजींच्या कणखर नेतृत्वामुळे देशवासियांना इंधन टंचाई किंवा महागाईच्या झळा सहन कराव्या लागल्या नाहीत.

राजीव गांधीजींचा दाखला देऊन ते पुढे म्हणाले की, राजीव गांधी पंतप्रधान असताना गरीब कल्याणासाठी केंद्र सरकार एक रुपया खर्च करत होते. त्यापैकी दहा पैसेच लाभार्थ्याच्या हातात पोहोचायचे. राजीवजी देखील हे जाहीरपणे बोलून दाखवायचे. पण मोदीजी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सर्वात प्रथम जनधन योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी गरीब कुटुंबातील व्यक्तींचे बॅंकेत खाते सुरू केले, अन् या खात्यात केंद्र सरकारच्या विविध योजनांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा करायला सुरुवात केली. त्यामुळे लाभार्थ्यांना सरकारच्या योजनांचा थेट लाभ मिळू लागला. तेव्हा माननीय मोदीजींच्या असाधारण कर्तृत्वामध्ये अगणित लघुपट निर्माण होण्याची ताकद आहे. त्यामुळे पुढील वर्षी देखील अशाच प्रकारची स्पर्धा भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित करावी, त्या माध्यमातून गरीब कल्याणाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यास मदत मिळेल, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर नरेंद्रजी मोदी हे देशाला सापडलेले अलैकीक व्यक्तिमत्त्व आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि मोदीजींनी देशासाठी झिजायला शिकवले. त्यामुळे अशा व्यक्ती सर्वांसाठी वंदनीय आहेत. आज संपूर्ण देशातील हिंदूंनी एकजूट होऊन देशासाठी अहोरात्र झिजणाऱ्या व्यक्तींच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Recent Posts

अक्षय्य तृतीयेला घरी आणा लक्ष्मी मातेच्या या प्रिय गोष्टी, वाढेल धनदौलत

मुंबई: अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) सण प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला तिथी साजरी केली…

40 mins ago

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिकेच्या संघाची घोषणा, भारतीय खेळाडूंचा भरणा

मुंबई:आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४ची(icc mens cricket world cup 2024) क्रिकेट चाहते अतिशय आतुरतेने वाट…

2 hours ago

Loksabha Election 2024: मतदानाआधी दिल्ली काँग्रेसला झटका, माजी प्रदेश अध्यक्ष अरविंदर सिंह लवली भाजपमध्ये

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष…

3 hours ago

Godrej: भावंडांच्या मतभेदातून गोदरेज कंपनीच्या वाटण्या…

Godrej Family Split: गोदरेज कुटुंबाने 30 एप्रिल रोजी 127 वर्ष जुन्या कंपनीला दोन संस्थांमध्ये विभाजित…

3 hours ago

Saving Plan: दररोज वाचवा केवळ २५० रूपये आणि मिळवा २४ लाख रूपये

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही रक्कम वाचवत असतो. तसेच ही रक्कम अशा जागी…

4 hours ago

‘या’ तारखांना लागणार दहावी-बारावीचे निकाल…

CBSC: काही दिवसांपासुन दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमामध्ये व्हायरल होत आहेत. हा प्रकार…

5 hours ago