महायुतीत काही जागांबाबत पेच कायम?

Share

संकटमोचक महाजन आणि अजितदादांमध्ये पुण्यात तासभर चर्चा

पुणे : पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आली तरी सत्ताधारी महायुतीमधील काही मतदार संघातील उमेदवरांचा पेच सुटलेले नाही. नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी कल्याण व मुंबईतील काही मतदारसंघातील उमेदवार अद्यापही जाहीर होऊ शकलेले नाहीत. तसेच, काही मतदारसंघात महायुतीमध्ये अंतर्गत कुरबुरी आहेत. काही मतदारसंघावर तीनही पक्षांनी दावा केला असल्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचे घोडे अडलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यात भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाली. या वेळी धाराशिवचे राणा जगजितसिंह पाटील हेही उपस्थित होते.

विरोधकांच्या महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण होऊन आघाडीचे नेते व उमेदवार प्रचाराला लागले आहेत. सांगली आणि मुंबईतील काही मतदारसंघावरून महाआघाडीत कुरबुरी आहेत. मात्र, इतर मतदारसंघात आघाडीचा प्रचार सुरू झाला आहे. इकडे सत्ताधारी महायुतीमधील पक्षांमध्ये काही मतदार संघाच्या जागावाटपावरून मतैक्य होऊ शकलेले नाही. नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, कल्याण व मुंबई आदींचा त्यात समावेश आहे.

उमेदवार जाहीर झालेल्या काही मतदारसंघात कुरबुरी आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपच्या उमेदवाराला मदत करीत नसल्याची तक्रार खुद्द उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह आमदार जयकुमार गोरे आणि राहुल कुल यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली हेाती.

माढ्यात रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपला मदत करणार नसतील तर आम्हीही बारामतीत सुनेत्रा पवार यांना मदत करणार नाही, अशी भूमिका दौंडचे आमदार राहुल कुल यांनी घेतल्याची चर्चा आहे. मात्र, फडणवीस यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निंबाळकर यांनी काही प्रश्न चर्चेतून मार्गी लागतील, अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत माढ्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, ज्या जागांसाठी अद्याप उमेदवार ठरले नाही, अशा मतदार संघाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाली. चर्चेवेळी तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील हे उपस्थित होते, त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदासंघाबाबतही काही अडचण आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या भेटीबाबत महाजन म्हणाले, मी पुण्यात रात्री दादा पुण्यात आहेत, असे समजल्यावर त्यांना भेटायला आलो होतो. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.

येत्या दोन ते तीन दिवसांत महायुतीमधील जागा वाटप जाहीर होईल. नाशिकच्या जागेबाबत आता सांगणं कठीण आहे. पण, येत्या दोन दिवसांत महायुतीचे जागा वाटप जाहीर होईल. बारामतीच्या जागा सुनेत्रा पवार ह्याच जिंकणार आहेत, यात आमच्या मनात शंका नाही, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

Tags: Mahayuti

Recent Posts

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…

11 seconds ago

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

2 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

3 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

4 hours ago

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

5 hours ago

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

6 hours ago