राजापुरात आज भाजपचा रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळावा

Share

राजापूर (प्रतिनिधी ) : राजापूर तालुक्यात धोपेश्वर-बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आता अंतिम स्वरूप आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून याबाबत आता सकारात्मक निर्णय होणार असून हा प्रकल्प राजापुरात उभारण्याबाबत हिरवा कंदील मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर राजापुरात भाजप राजापूर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आज रविवार २९ मे रोजी रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी भाजपाच्यावतीने करण्यात आली आहे.

आज सायंकाळी ४ वाजता राजापूर शहरातील गुजराळी येथील श्री मंगल कार्यालयात स्वागत मेळावा होणार असून भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे व भाजप प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याच्या माध्यमातून रिफायनरी प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज दूर करतानाच प्रकल्पाच्या माध्यमातून काय हवे आणि काय झाले पाहिजे याची चर्चा करून तशा मागण्यांचा अहवाल शिष्टमंडळ केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन त्यांना देणार आहे.

राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचे सर्वत्र स्वागत होत आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारला पत्र देऊन या प्रकल्पासाठी जागा देण्यात येणार असल्याचे कळविले आहे. तर सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत हालचाली गतिमान झाल्याचे जठार यांनी सांगितले. केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष प्रकल्पस्थळावर पाहणी करून तांत्रिक बाबीही तपासल्या जात आहेत.

या रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्यात भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

3 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

4 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

5 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

5 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

5 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

5 hours ago