Bharat Ratna Award: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न, मोदी सरकारची मोठी घोषणा

Share

नवी दिल्ली: बिहारचे(bihar) माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर(karpoori thakur) यांना भारतरत्न दिला जाणार आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिला जाणार आहे. सरकारने ही घोषणा कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केली आहे. २४ जानेवारीला त्यांची जयंती आहे.

कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी दीर्घकाळापासून केली जात होती. मंगळवारी जदयू नेते केसी त्यागी ठाकूर यांना भारतरत्न देण्यासोबतच त्यांच्या नावाने विश्वविदयालय सुरू करण्याची मागणी केली होती.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत सोशल साईटवरून कर्पूरी ठाकूर यांचा फोटो शेअर करत लिहिले, मला आनंद आहे की भारत सरकारने सामाजिक न्यायाचे प्रतीक महान जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तेही अशा वेळेस जेव्हा आपण त्यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत.

 

कर्पूरी ठाकूर यांना बिहारमध्ये जननायक म्हणून ओळखले जाते. ते काही काळासाठी बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १९७० ते १९७१ या कार्यकालात काम केले होते. त्यानंतर डिसेंबर १९७७ ते एप्रिल १९७९ पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर राहिले. पहिल्यांदा ते सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय क्रांती दलाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते आणि दुसऱ्यांदा ते जनता पार्टीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते.

स्वतंत्रता आंदोलनात झाले होते सहभागी, तुरुंगातही गेले होते

कर्पूरी ठाकूर यांचा जन्म बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्याच्या पिताँझिया गावात गोकूल ठाकूर आणि रामदुलारी देवी यांच्या घरात झाला होता. विद्यार्थी जीवनात राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित होते आणि ऑल इंडिया स्टुंड्टस फेडरेशनमध्ये सामील होते. त्यांनी भारत छोडो आंदोलनात सामील होण्यासाठी स्नातक कॉलेज सोडले होते. स्वतंत्रता आंदोलनात सामील होण्यासाठी त्यांनी २६ महिने जेलमध्ये घालवले होते.

Tags: biharpm modi

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

3 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

4 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

5 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

5 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

5 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

5 hours ago