Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

भंडारा (हिं.स.) : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर (खरबी) जवळील भारत पेट्रोलपंपजवळ उभ्या असलेल्या ट्रकला रायपूरकडून नागपूरच्या दिशेला जात असलेल्या भरधाव ट्रकने मागून धडक दिली. या भीषण अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर (खरबी) येथे घडली आहे.

हा ट्रक नागपूर कडे जात असताना मागून येत असलेल्या ट्रक ने मागील बाजूने धड़क दिली, ही धडक इतकी जोरदार होती कि ट्रक मधील लोहा कॅबिनला चिरत बाहेर निघाला, हा अपघातात क्लीनर रोहीत हिरालाल पटेल वय २२ वर्षे, मुरारी दिलीप सिंग वय २८ वर्षे, दोन्ही रा. गोपालगंज बिहार हे गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यु झाला व चालक शत्रोहन प्रभु प्रसाद वय ३० वर्षे रा. गोपालगंज बिहार यांचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला.

या अपघातामुळे काही तास वाहतूक कोलमडली होती. नंतर दोन्ही ट्रकला क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -