मुंबई: पाकिस्तानचा(pakistan)3 संघ विश्वचषक २०२३मधून(world cup 2023) बाहेर जाला आहे. सेमीफायनलमध्ये खेळण्याच्या त्यांच्या आशा शनिवारी इंग्लंडविरुद्ध टॉस हरण्यासोबतच संपल्या होत्या. पाकिस्तानच्या संघाला ९ सामन्यात आज ४ विजयांसह मायदेशी परतत आहेत.
या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने सुरूवातीचे दोन सामने जिंकत चांगली सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर त्यांची ट्रेन रूळावरून घसरली. या स्पर्धेत जेव्हा पाकिस्तानने एकामागोमाग एक सामने गमावले जेव्हा बाबरच्या हातून कर्णधारपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता जेव्हा पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हानच संपले आहे त्यामुळे सर्वाधिक चर्चा संघाच्या नेतृत्व परिवर्तनाची होत आहे.
पीटीआयशी बोलाताना पीसीबीच्या एका सूत्रांनी सांगितले, बाबरने याआधी आपल्या सहकारी खेळाडूंशी बातचीत केली आहे. अनेक खेळाडूंनी त्याला स्वत:हून पद न सोडण्याचा सल्ला दिला आहे. विश्वचषकात सेमीफायनलमध्ये जागा बनवू न शकल्याने संघासोबत माघारी परतण्याने निश्चितच बाबरवर कारवाई होऊ शकते. मात्र तो स्वत: कर्णधारपद सोडणार नाही.
बाबरने २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या वनडे संघाची कमान सांभाळली होती. त्याला सरफराज खानच्या जागी रिप्लेस करण्यात आले होते. यानंतर २०२१मध्ये त्याला कसोटी कर्णधारपद मिळाले. टी-२० वर्ल्डकप २०२२मध्ये त्याने आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचवले होते.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…