मीरा भाईंदर महापालिकेचे चार वर्षांपासून लेखा परीक्षण बंद

Share

माजी नगरसेवकाकडून महापालिका आयुक्तांकडे तक्रार

भाईंदर : मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमानुसार महापालिकेचे प्रत्येक वर्षी लेखा परिक्षण करणे अनिवार्य आहे. यासाठी शासनाकडून प्रभारी मुख्य लेखा परिक्षकांची नियुक्ती केली जाते. या लेखा परिक्षकाकडून लेखा परीक्षण अहवाल प्रत्येक आर्थिक वर्षाला प्रशासनाकडे मान्यतेसाठी सादर करावा लागतो, असे असतानाही मीरा भाईंदर महापालिकेचे गेल्या चार वर्षांपासून लेखा परीक्षण झाले नसल्याचे उघडकीस आले आहे.

महापालिकेच्या आर्थिक कारभारावर देखरेख तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी, अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे दैनंदिन जमा खर्च पाहणे यासाठी शासनाकडून प्रभारी मुख्य लेखा परिक्षकांची नियुक्ती केली जाते. या लेखा परिक्षकाकडून लेखा परीक्षण अहवाल प्रत्येक आर्थिक वर्षाला प्रशासनाकडे मान्यतेसाठी सादर करणे अपेक्षित असते. परंतु गेल्या चार वर्षांपासून लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याची तक्रार माजी नगरसेवक अजित पाटील यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रक्कमा मनपा फंडात जमा झाल्याबाबत संभ्रम

लेखा परिक्षणासाठी महापालिकेने २०२० पासून निवृत्त शासकीय अधिकाऱ्यांची लेखापरिक्षक तथा लेखाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्या अधिकाऱ्यांच्या पगारावर मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असताना कोणत्याही प्रकारचे लेखा परिक्षण झालेले नाही. त्या अधिकाऱ्या कडून परीक्षण करून घेण्याची जबाबदारी मुख्य लेखा परिक्षक, लेखा परिक्षण विभाग यांची असताना त्यांनी आपल्या कामात कसूर केल्याचा आरोप अजित पाटील यांनी केला आहे. महापालिकेकडे जमा होणाऱ्या रक्कमांचे लेखा परिक्षण वेळच्या वेळी करणे आवश्यक असताना कोणतेही लेखा परिक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे जमा झालेल्या रक्कमा महापालिका फंडात जमा झाल्या किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

महापालिकेचे अंतर्गत लेखापरिक्षण वेळच्या वेळी करणे अनिवार्य असताना लेखा परिक्षणात विलंब तसेच दिरंगाई केली असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा पाटील यांनी करून याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

चार वर्षांपासून लेखा परीक्षण झाले नाही. कोरोना काळात लेखापरिक्षणाचे काम मागे पडले गेले, त्यानंतर या कामाची गती मंदावली होती. आता लेखापरिक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून चारही वर्षांचे लेखापरिक्षण ३१ मार्चपर्यंत पुर्ण होईल. – सुधीर नाकाडी, मुख्य लेखा परिक्षक

Recent Posts

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

25 mins ago

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

59 mins ago

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

4 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

5 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

5 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

6 hours ago