Categories: क्रीडा

Asian Kabbadi Championship: इराणला नमवत भारताची अंतिम फेरीत धडक

Share

आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धा

सेऊल (वृत्तसंस्था) : बलाढ्य इराणला ३३-२८ असे नमवत भारताने आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप (Asia Kabbadi Championship) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गुरुवारी उपांत्य फेरीचा हा सामना झाला. भारतीय संघाचा हा लागोपाठ चौथा विजय आहे.

भारतीय संघाचा कर्णधार पवन सहरावतने दमदार चढाया मारत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने जमवलेल्या ३३ पैकी १६ गुण एकट्या पवनने मिळवले. महाराष्ट्राच्या अस्लम इनामदारने सामन्याच्या ११व्या मिनिटाला चढाईत २ गुण मिळवत इराणला ऑलआऊट केले. त्यामुळे भारताने ११-५ अशी आघाडी घेतली. सहरावतच्या अप्रतिम चढायांच्या बळावर पहिल्या हापला चार मिनिटे शिल्लक असताना भारताची आघाडी १७-७ अशी होती. मध्यंतराला भारताकडे १९-९ अशी १० गुणांची आघाडी होती. इराणने पहिल्या हाफनंतर आपला खेळ उंचावत शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या हापच्या सुरुवातीलाच इराणने भारताला ऑलआऊट केले. त्यामुळे २६-२२ असा अटीतटीचा सामना रंगला. इराण फक्त चार गुणांनी भारताच्या मागे होता. अखेरच्या काही मिनिटांत भारताने आपला खेळ उंचावला. सुपर टॅकलनंतर अर्जुन देशवालने दोन गुण मिळवले. अखेर भारताने ३३-२८ असा विजय मिळवला.

भारतीय संघाने लागोपाठ चौथ्या विजयाची नोंद केली. भारताने आठव्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशीपच्या विजायाकडे कूच केली आहे. आतापर्यंत भारताने सात आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत चषकावर नाव कोरले आहे. इराणने एक वेळा विजेतेपद पटकावला आहे. इराणने २००३ मध्ये आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत चषकावर नाव कोरले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

49 mins ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

2 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

2 hours ago

मुंबईकरांच्या विकासाला कौल देणारी निवडणूक

सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…

7 hours ago

होर्डिंग काळ बनून येतो तेव्हा…

विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…

8 hours ago

होर्डिंग माफियांना आवर घाला!

रवींद्र तांबे दिनांक १३ मे, २०२४ रोजी सायंकाळी ४.३०च्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर पूर्वेकडील द्रुतगती…

8 hours ago