चीनमधील गाशा गुंडाळून ‘ॲपल’ येणार भारतात!

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीनंतर जगभरातील बाजारांमध्ये खळबळ उडाली असताना बिकट परिस्थितीत मात करीत आता भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारली असून सर्व बाबतीत सतत पुढे सरसावत आहे. उद्योग आणि बांधकाम क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे.

त्याचाच परिणाम म्हणून जगातील सर्व प्रसिद्ध कंपन्यांच्या नजरेत भारत ही गुंतवणुकीसाठी सुरक्षित बाजारपेठ बनत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या अन्य देशांतून आपला व्यवसाय बंद करून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्नात आहेत. अशातच आता टेक जायंट कंपनी ‘ॲपल’ बाबतची एक मोठी माहिती पुढे आली आहे.

त्यानुसार ‘ॲपल’ चीनमधून आपला गाशा गुंडाळून दुसऱ्या देशात म्हणजेच भारतात येण्याचा विचार करत आहे. आपल्या उत्पादन वाढीसाठी भारत हा एक चांगला पर्याय असल्याचे कंपनीचे मत झाले आहे. भारताला पहिली पसंती- ‘ॲपल’ने त्यांच्या अनेक कंत्राटी उत्पादकांना चीनबाहेर उत्पादन वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, ‘ॲपल’ भारतात आणि व्हिएतनाममध्ये आपला व्यवसाय सुरू करण्याच्या शक्यतांचा विचार व अभ्यास करत असल्याची माहिती आहे.

‘ॲपल’च्या जागतिक उत्पादनात सध्या भारत आणि व्हिएतनामचा वाटा फारच कमी आहे. एका अंदाजानुसार, आयफोन, आयपॅड व मॅकबुक कंप्यूटर यांसारखी ९० टक्के ‘ॲपल’ उत्पादने चीनमध्ये स्वतंत्र उत्पादक तयार करतात.

Recent Posts

Mobile: तुमच्या या चुकांमुळे मोबाईलची बॅटरी पटापट संपते

मुंबई: हल्ली मोबाईल फोन(mobile phone) सगळ्यांची गरज बनली आहे. फोन नेहमी व्यवस्थित चालू राहावा यासाठी…

1 hour ago

Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील…

3 hours ago

Team india: टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे काही खेळाडू टी-२० वर्ल्डकपची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप झालेले दिसत होते. मात्र…

3 hours ago

रायगड लोकसभेत सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला

निवडणूक लोकसभेची मात्र, विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला पेण(देवा पेरवी): रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान…

4 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दि. ०७ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण चतुर्दशी ११.४१ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी.…

6 hours ago

आज मुंबईत पाणीकपात !

जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही…

8 hours ago