Saturday, May 4, 2024
Homeदेश'मन की बात'च्या ९० व्या भागासाठी अभिनव कल्पना पाठवण्याचे आवाहन

‘मन की बात’च्या ९० व्या भागासाठी अभिनव कल्पना पाठवण्याचे आवाहन

नवी दिल्ली (हिं.स)पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार २६ जून मे सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा ९० वा भाग असेल. २०२२ वर्षाचा हा सहावा भाग असणार आहे.

नागरिक २४ जून पर्यंत ‘मन की बात ‘ कार्यक्रमासाठी माय गोव्ह, नमो अप्लिकेशन किंवा 1800117800 क्रमांकाच्या माध्यमातून ध्वनिमुद्रित करून सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात.

जून महिन्याच्या ‘मन की बात’ साठी राष्ट्राला प्रेरणा देणार्या काही मनोरंजक कथा किंवा कल्पना असल्यास, तुमचा संदेश मुद्रित करीत 1800-11-7800 वर पाठवा , संपर्क करा किंवा https://t.co/90z2NgJPpr येथे पाठवा असे आवाहन ‘माय गोव्ह’ आप्लिकेशन ने केले आहे.

मन की बात चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, माय गोव्ह आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही मन की बात चे प्रसारण आयोजित केले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -