बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत (Nationalist Congress Party) चालू असलेल्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल आहे का, याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनादिवशी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांना कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्यात आलं मात्र अजित पवारांना (Ajit Pawar) देश पातळीवर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही, यावरही जोरदार राजकारण रंगलं. त्यात आता काहीच दिवसांपूर्वी अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाऐवजी पक्षांतर्गत महत्त्वाचे पद देण्याची इच्छा व्यक्त केली. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथील आजच्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.
“हा निर्णय कुणी एकटा घेत नसतो. अजित पवारांसह प्रमुख लोक बसतील आणि त्यासंदर्भातला निर्णय घेतील. आज पक्षसंघटनेच्या कामात सगळ्यांनीच लक्ष द्यावं अशी भावना आहे. तेच मत त्यांनी व्यक्त केलं. त्यापेक्षा वेगळं काही नाही”, असं शरद पवारांनी नमूद केलं.
पुढे बोलताना ते म्हणाले, “पक्षासाठी आणि संघटनेसाठी काम करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळं अजित पवारांनी काही वेगळं केलेलं नाही. पक्षासाठी काम करायच्या भावनेनं अजित पवारांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. ”
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवारांना देश पातळीवर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. यावर विरोधी पक्षनेत्याची राज्य पातळीवर खूप मोठी जबाबदारी माझ्यावर असल्याचे अजित पवार म्हणाले होते. मात्र मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईन, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी केलं. त्यामुळे पवारांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या समर्थकांच्या मागणीने जोर धरल्याने पक्षांतर्गत दबाव गट निर्माण होत असल्याची चिन्हे निर्माण झाली होती. यात आता शरद पवारांनी अजित पवारांसह प्रमुख लोक निर्णय घेतील, असं म्हटल्याने अजित पवार पुढे काय करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.
रवींद्र तांबे आपल्या लोकशाहीप्रधान भारत देशात महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात दरवर्षी विविध कार्यक्रमांनी साजऱ्या केल्या…
CSK vs GT: नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. चेन्नई…
मुंबई: मोटोरोलाने आपला नवा स्मार्टफोन Moto G Stylus 5G लाँच केला आहे. कंपनीने अमेरिकन मार्केटमध्ये…
नंदुरबार : महाराष्ट्राचे एक दिग्गज नेता. गेल्या ४०-५० वर्षांपासून राजकारणात आहेत. ते काहीबाही बोलत असतात.…
मुंबई: उन्हाळा असो वा थंडी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. यामुळे प्रत्येक मोसमात खूप पाणी…
नाशिक : सिन्नर : सिन्नर शहरासह तालुका परिसरात अक्षय तृतीयाच्या दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर वातावरण…