Share

मुलींच्या जन्मदराबाबत अजित पवारांनी सांगितली वस्तुस्थिती

इंदापूर : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मात्र प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी येणाऱ्या काळात द्रौपदीचा (Draupadi) विचार करावा लागेल, असा प्रसंग येऊ शकतो, असे वादग्रस्त विधान करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सध्याची वास्तव वस्तुस्थिती सांगितली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती, दौंड आणि इंदापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यात गर्भपात आणि मुलींच्या जन्मदराबाबत विधान करताना, भविष्यात सगळंच अवघड होणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेमधील काही जाचक अटी कमी करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती. यासंदर्भात सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारी यंत्रणेकडून निश्चित तुम्हाला त्रास होत असेल, काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला त्रास दिला जात असेल. परंतु बीडच्या घटना आणि पाठीमागील काळात १००० मुले जन्माला आले की त्यावेळेस ८०० ते ८५० मुली जन्माला येत होत्या. मग हा दर ७९० पर्यंत गेला. हे सर्व पाहता यापुढे द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रश्न पडतो. परंतु हा गंमतीचा भाग झाला. मला कुणाचा अपमान करायचा नाही, परंतु डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांचा शासन दरबारी विचार केला जाईल, असे अजित पवार म्हणाले.

मोदींसारखा माणूस पाहायला मिळत नाही

अजित पवार म्हणाले की, मी विकास करणारा माणूस आहे. मी आजपर्यंत अनेक पंतप्रधान पाहिले. मी मोदींना विरोध करत होतो, पण त्यांच्यासारखा माणूस सारखा सारखा पाहायला मिळत नाही. त्यांनी अनेक कामे केली आहेत. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला कोणताही चेहरा नाही. राहुल गांधींचा चेहरा आपण धरला तर काय चित्र दिसतं तुम्हाला? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थितांना विचारला.

तर त्यांना जोरात इंजेक्शन द्या

अजित पवार म्हणाले की, माणूस खरं कोणाशी बोलत असेल तर तो डॉक्टरशी बोलतो. त्यामुळे तुमच्याकडे जर कोणी आलं तर त्यांच्याशी बोला, त्यांना विचारा काय चाललं आहे. जर त्यांनी आमचं नाव घेतलं तर त्यांच्याशी जरा चांगलं बोला आणि जर दुसऱ्याचं नाव घेतलं तर त्यांना जोरात इंजेक्शन द्या, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली.

महायुतीचा खासदार आतापर्यंत निवडून दिलेल्या खासदारांपेक्षा उजवा असेल

यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, आतापर्यंत तुम्ही आमच्या खासदाराला निवडून दिले आहे. त्यामुळे आता महायुतीच्या खासदाराला निवडून द्या. महायुतीचा खासदार आतापर्यंत निवडून दिलेल्या खासदारांपेक्षा उजवा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Recent Posts

मतदानाचा टक्का घसरला; कोण जबाबदार?

मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…

1 hour ago

नेहमी खोटे बोलणारे लोक! काय आहे मानस शास्त्रीय कारण?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…

2 hours ago

घोषणा आणि वल्गना…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…

3 hours ago

IPL 2024: अय्यरच्या जोडीचा धमाका, कोलकाता आयपीएलच्या फायनलमध्ये

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या…

4 hours ago

Reel बनवण्याच्या नादात तरूणाने १०० फूट उंचावरून पाण्यात मारली उडी, झाला मृत्यू

मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…

5 hours ago

मुंबईतील मतदान प्रक्रियेच्या ढिसाळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे…

6 hours ago