श्रीभालचंद्र ऊर्फ नागडे महाराज हे खरोखरच कोण? हे एक न सुटणारे महान कोडे आहे! त्यांचे भक्त आपापल्या बुद्धिप्रमाणे त्यांना अनेक अवतारात ओळखतात; परंतु त्यांचे विशेष आकर्षण हे आहे की, त्यांचे भक्त अनेक धर्मांचे, जातीचे आणि पंथाचे आहेत. त्यांच्याकडे परभाव नाही. ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘पाणी जसे गायी आणि वाघ पीत असतेवेळी आपला जीवनधर्म सोडत नाही तसेच वृक्ष जसा त्याला लावणारा आणि तोडणारा या दोघांवरही छाया सारखीच करतो.’ तद्वतच श्रीभालचंद्र महाराज त्यांचा भक्त मग तो कोणत्या धर्माचा नि पंथाचा असो किंवा त्यांना त्यावेळी लाथा मारणारा असो, त्यांना दुजेपण माहीत नाही. ते सदा गंगेसारखे पवित्र व हिमालयासारखे विशाल होते! सागरासारखे अथांग व आभाळासारखे असीम होते!! त्यांच्या थोरवीबद्दल लिहायचे तेवढे थोडेच आहे. किती लिहिले तरी शब्द अपुरेच पडतात. वास्तविक भालचंद्र म्हणजे गणपती. संत रामदास म्हणतात, ‘मुळारंभही तोच आणि आरंभही तोच!’ तुकोबा म्हणतात, ‘चंदनाचे हातही चंदन आणि पायही चंदन’ अशी थोर योग्यता बाबांची आहे. ते ब्रह्मानंदी टाळी लागलेले परब्रह्म आहेत! तरी अशा त्या थोर योगमार्तंडाच्या आणि योगियांच्या चरणी अनंत कोटी प्रणिपात असोत!
राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!
काशी व मथुरेमध्ये मंदिर बांधण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा…
मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जोरदार टिका यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा मुंबई…
उपमुख्यमंत्र्यांची उत्तर मुंबई लोकसभेसाठी आढावा बैठक मुंबई : उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस…
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…
आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…