औरंगाबाद : आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झालेलाच नाही असा दावा औरंगाबाद पोलिसांनी केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातील महालगाव यात्रेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. मात्र दानवे यांचा हा दावा खोटा असून असा काही प्रकार महालगावमध्ये घडला नाही. आदित्य ठाकरेंची सभा संपल्यानंतर काही प्रमाणात गोंधळ झाला त्यात माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला, असा दावा औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांनी केला आहे.