मुंबई : गेल्या महिनाभरापासून मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून येत्या काही दिवसांत हे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याच वेळी घरातील एसी, पंखा, फ्रीज यांसारख्या वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. अशातच अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका वीज ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता उन्हाच्या चटक्यांसोबत वाढत्या वीज बिलाचा शॉक बसणार आहे.
अदानी कंपनीने गतवर्षी झालेल्या इंधन खर्चातील ३१८ कोटी ३८ लाख रुपयांची वाढ वसूल करण्यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे आदरपूर्वक प्रस्ताव सादर केला होता. याबाबत आयोगाने सोमवारी मान्यता दिली. ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते २४ या काळात ग्राहकांकडून वसूल केली जाईल. या वाढत्या वीजेचा फटका तब्बल ३० लाख वीज ग्राहकांना बसणार आहे. तर वाणिज्य, औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठी, इंधन अधिभार वापरानुसार निर्धारित केला जाईल.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीजदरवाढ करण्यात आली. त्यानंतर उत्तरेकडील राज्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. पण महाराष्ट्राचा विचार केला तर वीजदरवाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारं राज्य ठरलं आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचा दर जास्त असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…
कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…
हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…
कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…
मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…