Categories: ठाणे

अचूक पावसाचा अंदाज वर्तवते शेतकऱ्याचे अचूक हवामान खाते

Share

अतुल जाधव

ठाणे : शेतकऱ्यांसाठी पावसाचा अंदाज हा खूप महत्वाचा असतो, पावसाच्या अंदाजावर शेतीच्या विविध कामांचे नियोजन करायचे असल्याने पावसाच्या अंदाजावरच शेतीचे गणित अवलंबून असते. मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांची शेतीची कामे अवलंबून असतात. जसे हवामान खाते करोडो रुपयांच्या अधुनिक मशिन्समधून देखील अचूक अंदाज देत नाही, तर वर्षानुवर्ष ज्या अंदाजावर शेतकरी शेती करतो तो निसर्गाचा अंदाज मात्र कधीच खोटा होत नाही व चुकतही नाही.

शेतकरी शेती लागवडीसाठी निवडलेले उत्तम बियाणे साठवून ठेवतात व मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसात पेरणी केली जाते; परंतु या नक्षत्रांत पेरणी करण्याअगोदर पाण्याचा अचूक अंदाज निसर्गाकडून पशू-पक्ष्यांकडून मिळाल्याशिवाय शेतकरी शेतीची कामांना सुरुवात करत नाहीत. यात पावसाचा अचूक अंदाज देणार व मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बहरून येणार बाव्ह्याचं झाड होय. या झाडाला पिवळी फुले येतात, ती एवढी असतात की झाडाची पाने दिसतच नाहीत, ज्या वेळेस या झाडाला तुरळक फुले येतील, त्या वेळेस पाऊस अवेळी व अल्प समजला जातो, तर बहरून आला तर मुबलक समजला जातो. हा पहिला अंदाज तर मे महिन्यात जर कावळ्याने गावालगतच्या झाडाच्या मजबूत बेचकीयुक्त फांदीवर घरटे बांधले, तर वादळीवारा, विजा कोसळणे धुवाँधार पाऊस होणार आणि जर गावाबाहेरील झाडाच्या शेंड्यावरील फांदीवर घरटे बाधले तर तुरळक सरीचा व कमी पाऊस पडणार. हा झाला कावळ्याचा अंदाज.

शेतावरील मुंग्यानी वारूळ करताना एक ते दीड इंच केले, तर पाऊस कमी पडणार व जर हेच वारून १५-२० इंच करून त्याला तांबड्या मातीने बाहेरून सारवल्या सारखे पॅकबंद केले, तर धुव्वांधार पाऊस चार महिने बरसणारच. अशाच प्रकारे वाळवीच्या झुंडी निघू लागल्या, पतंगाचे थवे उडताना दिसू लागले, तर पाऊस पडणार हे अचूक संकेत मिळाले की, शेतकरी पेरणीला सुरुवात करतो; परंतु या उलट संकेत आले, तर बेभरवशाचा पाऊस म्हणून सावध पवित्रा घेत भातपिकासोबत कमी पावसात येणारी नाचणी, वरई, भूईमुग, मक्यांच कणीस या नगदी पिकावर भर देतात व हा शेकडो वर्षाचा अंदाज अद्यापही अचूक असून याच अंदाजावर शेतकरी तरी खरोखरंच अवलंबून असून तो कधीच फोल ठरत नाहीच

निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाचे नुकसान

खरीप हंगामात अक्षरश: अवकाळी पावसाने त्राहिमाम् माजवला होता, यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते. या दुःखातून कसातरी बळीराजा सावरला आणि रब्बी हंगामाकडे वळला. मात्र रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाची अवकृपा बघायला मिळाली, हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाचे सावट होते, त्यावेळी शेतकरी बांधवांनी योग्य नियोजनाने रब्बीची पिके वाचवली, त्यानंतर अवकाळी पावसाने राज्यात बरेच नुकसान केल्याचे पाहायला मिळाले.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

5 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

6 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

7 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

7 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

7 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

7 hours ago