Bihar Hotel Fire : बिहारमधील हॉटेलला भीषण आग! ६ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी

Share

४५ लोकांना वाचवण्यात यश

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा (Bihar News) येथील जंक्शनच्या अगदी समोर असलेल्या बहुमजली पाल हॉटेलमध्ये (Patna Pal Hotel) आज सकाळी भीषण आग लागली. सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली आणि अर्ध्या तासात संपूर्ण इमारत आग आणि धुराने भरून गेली. या आगीत सहा लोकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. अग्निशमन दल सध्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.

ही आग इतकी भीषण होती की, हॉटेलला लागून असलेल्या इमारतीपर्यंतही आग पोहोचली आणि दोन्ही इमारतींमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. लगतच्या पाटणा किरणालाही आगीचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. इमारतीसमोरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून, स्टेशन रोडही पूर्णपणे ठप्प झाला आहे. या आगीसमोर अग्निशमन दलाची व्यवस्था कमकुवत ठरत आहे.

आग लागल्यानंतर दीड तासानंतर एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अर्ध्या तासानंतर दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाटणा सेंट्रल रेंजचे टीएसपी सत्य प्रकाश यांनी या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. त्यात तीन महिला आणि तीन पुरुष आहेत. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सुमारे २० जण जखमी असून त्यांना पाटणा मेडिकल कॉलेजममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हॉटेलच्या किचनमध्ये लागलेली आग चार मजली इमारतीत पसरल्याचे स्थानिकांनी सांगितले. वरच्या मजल्यावर नाश्ता करणाऱ्या लोकांना त्याचा फटका बसला. या घटनेनंतर परिसरात घबराहट पसरली होती. आजूबाजूच्या हॉटेल आणि दुकानातील लोक रस्त्यावर आले. अग्निशमन दल बचाव कार्य आणि लोकांना बाहेर काढण्यात व्यस्त आहे. आतापर्यंत ४५ लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर काही लोकांनी इमारतीवरुन उड्या मारुन आपले प्राण वाचवले. या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.

Recent Posts

काशी-मथुरेत मंदिर उभारण्याची कोणतीही योजना नाही : जे.पी. नड्डा

काशी व मथुरेमध्ये मंदिर बांधण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा…

2 hours ago

उन्हाळ्यात आल्याचे सेवन करताय का? तर हे जरूर वाचा

मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत…

2 hours ago

Eknath Shinde : हिंदूत्व सोडले आता भगव्या झेंड्याची अ‍ॅलर्जी कारण तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जोरदार टिका यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा मुंबई…

3 hours ago

मोदी यांच्या काळातील विकासकामे प्रत्येक घराघरात पोहोचवा : फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांची उत्तर मुंबई लोकसभेसाठी आढावा बैठक मुंबई : उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस…

3 hours ago

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

5 hours ago

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

5 hours ago