मुंबई: क्रिकेट जगतासाठी दुख:दायक बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यांच्यासोबत एमसीएचे अजिंक्य नायक आणि एपेक्स काऊंसिल मेंबर सूरज समतही उपस्थित होते.
अमोल काळे यांनी वयाच्या ४७व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अमोल हे मूळचे नागपूरचे होते. त्यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळचे संबंध होते.
अमोल काळे यांचे मोठे निर्णय
अमोल काळे यांना २०२२मध्ये एमसीएच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली वानखेडे स्टेडियमने यशस्वीपणे २०२३चा वनडे क्रिकेट वर्ल्डकपचा शेवटचा सामना आयोजित केला होता. इतकंच नव्हे तर अंडर डोमेस्टिक क्रिकेटमध्येही मुंबईच्या संघाने यश मिळवले होते. नुकतेच मुंबईने रणजी ट्रॉफी २०२३-२४च्या हंगामात फायनलमध्ये विदर्भला १६९ धावांनी हरवत ट्रॉफी जिंकली होती. अमोल यांच्या नेतृत्वातच डोमेस्टिक खेळाडूंचा पगार डबल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा पुतळाही उभारला होता. अमोल काळे अनकदा लाल बॉल क्रिकेटला प्रोत्साहन देण्यााबाबत बोलत असतं. त्यांनी मुंबईच्या संघाला रणजी चॅम्पियन बनल्यानंतर ५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले होते. ते मूळचे नागपूरचे होते. एक दशकापूर्वी ते मुंबईला शिफ्ट झाले होते.