Friday, April 25, 2025
Homeदेश'मन की बात' मध्ये मोदींनी काय बोलावे?

‘मन की बात’ मध्ये मोदींनी काय बोलावे?

२०२१ वर्षातील अखेरच्या 'मन की बात' साठी अभिनव कल्पना पाठवण्याचे आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. ‘मन की बात’ चा हा ८४वा भाग असेल.

दरम्यान ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी नागरिक माय गोव्ह, नमो अप्लिकेशन किंवा 1800117800 क्रमांकाच्या माध्यमातून ४ ते २४ डिसेंबरपर्यंत सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात. २०२१ वर्षाचा हा शेवटचा भाग असणार आहे.

‘मन की बात’ चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही ‘मन की बात’ चे प्रसारण आयोजित केले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -