परदेशात आणि तटस्थ ठिकाणी खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत आता ऋषभ पंत अव्वल स्थानी पोहोचला आहे. पंतच्या नावावर परदेशात २५०१ धावांची नोंद झाली असून, त्याने महेंद्रसिंग धोनीला (२४९६ धावा) मागे सोडले आहे. या ऐतिहासिक यादीत फारुख इंजिनिअर (१२०९ धावा) तिसऱ्या, सय्यद किरमानी (११०९ धावा) चौथ्या आणि किरण मोरे (९०१ धावा) पाचव्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, पंतने ४१.६८ च्या उत्कृष्ट सरासरीने ही कामगिरी केली आहे, जी या यादीतील सर्व भारतीय यष्टीरक्षकांमध्ये सर्वोत्तम आहे.
विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घोषणापत्र सर्वसंमतीने स्वीकारून ब्रिक्स सदस्य देशांच्या क्रीडा ...
मैदानावर घडला थरार आणि दुखापतीशी संघर्ष
दुसरीकडे, हा सामना खेळाच्या दृष्टीने अत्यंत रोमांचक ठरला. कोलंबो येथील कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारच्या एका उसळत्या चेंडूवर (Short Ball) डाव्या हाताला चेंडू लागल्याने पंत गंभीर दुखापतग्रस्त झाला. वेदना सहन करत त्याला ५८ व्या षटकात १५ चेंडूत ३ धावा काढून फिजिओथेरपिस्टसोबत मैदानाबाहेर जावे लागले होते.
परंतु, दुसऱ्या दिवशी जिद्द आणि चिकाटीचे दर्शन घडवत पंत पुन्हा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी आखूड चेंडूंचा मारा करून त्याची पुन्हा परीक्षा घेतली आणि ड्रिंक्स ब्रेकपूर्वी त्याच्या खांद्यालाही दुखापत झाली. असे असतानाही पंतने हार मानली नाही. त्याने ध्रुव जुरेलसोबत मिळून संघाचा डाव सावरला आणि महत्त्वाची भागीदारी रचत ड्रिंक्स ब्रेकपर्यंत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. एका बाजूला दुखापतीचा त्रास आणि दुसऱ्या बाजूला संघासाठी दिलेला लढा, यामुळे क्रिकेट वर्तुळात पंतच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





