Nashik : श्रावणातील 'फेरी'चे सूक्ष्म नियोजन करा, सुरक्षिततेसोबत पाणी-वीज आणि वाहतूक व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

Nashik : श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, स्वच्छतागृहे आणि वाहतूक अशा मूलभूत सुविधांची प्रभावी व्यवस्था करावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Guardian Minister Girish Mahajan) यांनी दिले. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गासह गंगाद्वार, वाहनतळ आणि त्र्यंबकेश्वर शहरात आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य पथके, रुग्णवाहिका व दिशादर्शक फलक उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.



प्रदक्षिणा आरोग्य पथके नियुक्त करा


पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, श्रावण सोमवारनिमित्त भाविक ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालतात. या पार्श्वभूमीवर या मार्गावर आरोग्य पथके नियुक्त करावीत. स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी तसेच ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. गंगाद्वार येथे रुग्णवाहिका व आरोग्य पथक उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी. वाहनतळांच्या ठिकाणी वीज, पाणी, स्वच्छतागृहे आणि आरोग्य पथके उपलब्ध करून द्यावीत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर शहरात दैनंदिन स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.



श्रावणातील 'फेरी'चे सूक्ष्म नियोजन


यावेळी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांनी सांगितले की, श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सर्व विभाग एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पहिल्या सोमवारी गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. तसेच श्रावण महिना संपेपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरातील जुने रुग्णालयही सुरू ठेवण्यात येणार आहे. तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले की, तालुका प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पाच हजार भाविकांच्या क्षमतेचा मंडप घालण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार श्रीमती अहिरे आणि नगराध्यक्षा श्रीमती तुंगार यांनीही विविध सूचना केल्या.


यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गिते, प्रा. देवयानी फरांदे, सरोज अहिरे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, अपर पोलिस अधीक्षक विमला, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Jalgaon : बुरहानपूर येथे २५.१७ कोटींचा रेल्वे उड्डाणपूल; भुसावळ-खंडवा मार्गिकेच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प

Jalgaon : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत (Bhusawal Division of Central Railway) बुरहानपूर येथील लालबाग-खुनी भंडारा परिसरात रेल्वे व

Eijaz Khan on Govinda controversy : गोविंदा-सुनीता वादात एजाज खानची एण्ट्री; म्हणाला, “मुलांना भविष्यात काम मिळणं कठीण होऊ शकतं”

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा (Govinda - Sunita Ahuja) यांच्या वैवाहिक नात्यातील मतभेद पुन्हा

One Day One University Scheme : Gen Z सोबत थेट संवाद साधणार केंद्र सरकार; केंद्रीय मंत्र्यांची विद्यापीठांमध्ये भेट, ‘एक दिवस, एक विद्यापीठ’ योजनेची चर्चा

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढी, विशेषतः Gen Z सोबत थेट संवाद वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून नवा उपक्रम राबवण्याची

Nashik : अपात्र शिधापत्रिका लाभार्थ्यांना दणका ! ४० हजार अपात्र लाभार्थी वगळले

Nashik : राज्यातील गरजू नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळावे यासाठी गरजू नागरिकांना सरकारकडून शिधापत्रिका (Ration card)

Indian Navy MQ-9B Sea Guardian : चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताची मोठी तयारी; अमेरिकेकडून ३० महिन्यांसाठी दोन अत्याधुनिक MQ-9B Sea Guardian ड्रोन लीजवर

नवी दिल्ली : हिंद महासागर क्षेत्रातील समुद्री निगराणी क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा; गारपिटीचीही शक्यता

मुंबई : राज्यात सध्या काही भागांत पावसाची हजेरी सुरू असली, तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप दमदार पावसाची