Nashik : SIR प्रक्रियेसाठी मतदारांनी १७ ऑगस्टपूर्वी एन्युमरेशन फॉर्म भरण्याचे आवाहन

Nashik : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेंतर्गत मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत मतदारांनी एन्युमरेशन फॉर्म (E.F.) भरून सादर करणे आवश्यक असून, त्यासाठी १७ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.


मतदारांनी सर्वप्रथम electoralsearch.eci.gov.in (https://electoralsearch.eci.gov.in/) या संकेतस्थळावर जाऊन आपल्या EPIC क्रमांकाद्वारे मतदार यादीतील नाव तसेच संबंधित BLOची माहिती तपासावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह एन्युमरेशन फॉर्म ऑनलाइन किंवा संबंधित BLOमार्फत ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे. तसेच ECINET अ‍ॅपच्या माध्यमातूनही फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.



SIR प्रक्रियेदरम्यान BLO मतदारांच्या घरी भेट देऊ शकतात. त्यामुळे मतदारांनी BLOला आवश्यक सहकार्य करून आपली प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. फॉर्म वेळेत न भरल्यास मतदार यादीतील नावाबाबत अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


SIR संदर्भातील मदतीसाठी 0253-2310523 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत कायम असल्याची खात्री करून SIR प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Nitesh Rane : 'भारताला महासत्ता बनवण्याच्या प्रवासात सिंधुदुर्गचे योगदान मोलाचे असेल'

स्वातंत्र्यदिनी १२५ क्षयरुग्णांना दत्तक घेत घालून दिला नवा आदर्श मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत आणि