Pune Crime : मिसळ खाताना क्षुल्लक कारणावरून वाद; लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू

पुणे :आपण हॉटेलमध्ये खाण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी जातो. मात्र, कधी-कधी छोट्या-मोठ्या कारणांवरून तिथे वाद होतात. खरंतर असे वाद तिथेच मिटवून पुढे जाणे गरजेचे असते. पण पुण्यात अशाच एका क्षुल्लक वादाला धक्कादायक वळण मिळाले आहे. या वादातून झालेल्या हाणामारीत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या घटनेची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे.



नेमकं काय घडलं जाणून घ्या ?


मिसळ खाताना चुकून पायावर पाय पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना गणेश पेठ परिसरात घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवम राजेश परदेशी (वय 28) असे मृत तरुणाचे नाव असून वैभव किशोर साळुंखे (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम रिक्षाचालक होता, तर वैभव एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. दोघांचीही एकमेकांशी ओळख होती. 9 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवम गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकाजवळील एका मिसळ केंद्रात गेला होता. यावेळी गर्दीत त्याचा पाय चुकून वैभवच्या पायावर पडला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.


वाद वाढल्यानंतर वैभवने शिवमला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याच्या छातीवर, पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर मारहाण करण्यात आली. काही नागरिकांनी हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले. त्यानंतर शिवम घरी परतला.


घरी आल्यानंतर शिवमने छाती आणि पोटात दुखत असल्याचे आईला सांगितले आणि तो आराम करण्यासाठी झोपला. सायंकाळी सुमारे 7 वाजता त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले.


शवविच्छेदनानंतर शरीरातील अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये वैभव शिवमला मारहाण करताना दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरासखाना पोलीस पुढील तपास करत आहेत.


Comments
Add Comment

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी

Jalgaon Crime : नवरा-बायकोमधील भांडणाचा धक्कादायक शेवट ! आई अन् मुलाने थेट...

Jalgaon Crime News : नवरा बायको यांच्यामध्ये होणारे आणि नंतर टोकाले पोहोचलेले वाद क्षणाधार्त आयुष्याची कशी राखरांगोळी करू

Ayurvedic products : राज्यातील १३५ आयुर्वेदिक उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस

१० उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई मुंबई : राज्यात हॉटेल्स आणि औषध

Kurla Landslide : कुर्ल्यातील भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार - सचिन अहिर

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भूस्खलनाच्या