Nitesh Rane : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीत बसण्याची प्रत्येकाला इच्छा

- मंत्री नितेश राणे; जयंत पाटील-मुख्यमंत्र्यांच्या एकत्र प्रवासावर भाष्य


मुंबई : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत प्रवास करण्याची आणि त्यांचा सहवास लाभण्याची इच्छा राजकीय वर्तुळातील प्रत्येकाचीच असते. 'देवाभाऊं"चा सहवास लाभणे म्हणजे स्वतःचे भविष्य घडवण्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या प्रवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या मनात योग्य विचार येतील", अशी प्रतिक्रिया राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोमवारी दिली.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रविवारी मुंबई ते कोल्हापूर असा एकाच विमानाने एकत्र प्रवास केला. या अनपेक्षित एकत्र प्रवासामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रवासावर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खुसखुशीत प्रतिक्रिया दिली.



नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या गाडीत किंवा विमानात बसण्याची इच्छा सर्वांचीच असते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या वरिष्ठ आणि अभ्यासू नेत्यासोबत प्रवास मिळणे ही राजकीय दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास केला असेल, तर त्यातून त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी योग्य विचार येतील", अशी प्रतिक्रिया त्यांनी (Nitesh Rane) दिली.


Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे

India-Chile CEPA : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना वेग; वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी चिलीच्या उपमंत्री पॉला एस्तेव्हेझ वाइनस्टीन यांची घेतली भेट

नवी दिल्ली : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना पुढे नेण्यासाठी वाणिज्य सचिव राजेश

पंतप्रधान मोदी १३७ व्या 'मन की बात'मधून कोणत्या विषयांवर काय बोलले ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ३० ऑगस्ट २०२६ रोजी १३७ व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला